Saturday 16 January 2016

भाषेचे वैशिष्ट्य

# शिक्षणावर बोलू काही #
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगात असंख्य भाषा आहेत. प्रत्येक भाषेचे आपले एक वैशिष्ट्य असते. भारतीय भाषांचे खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्पष्ट उच्चारण. प्राचीन काळी यवनादी परकीय लोकांना ‘म्लेंच्छ’ म्हणत असत. त्याला कारण होेते. म्लेंच्छ् हा मूळ धातू असून ‘त्याचा अर्थ अस्पष्ट उच्चार’ असा आहे. म्हणजे जे अस्पष्ट उच्चार करतात ते म्लेंच्छ, हा अर्थ होता. याचाच अर्थ असा अभारतीय विशेषत: ‘यवन’ अस्पष्ट उच्चार करायचे. असो. हे सर्व सांगायचे कारण उच्चार ज्या तोंडावाटे म्हणजे कण्ठ, तालू, मूर्धा, दन्त, ओष्ठ यांच्या सह जिभेच्या साहाय्याने होतो तिचे वळण बालवयात संस्कारक्षम, वयातच लागायला पाहिजे. जसे मराठी बालकं ‘ळ’ चा उच्चार करू शकतात. पंजाबी उत्तरप्रदेशी प्रौढ तो उच्चार करू शकत नाहीत. कारण उच्चारणाचे संस्कार. मग बालवयात कोणते वर्ण उच्चार शिकवायला हवे? याचे नि:संदिग्ध उत्तर आहे ‘भारतीय’ भाषेचे. कारण इंग्रजीत अइउऊ इत्यादी २६ मुळाक्षरे म्हणजे ‘उच्चारण ध्वनी’ आहेत तर कोणत्याही भारतीय भाषांमध्ये इंग्रजी पेक्षा जास्त ध्वनी म्हणजे (वर्ण उच्चारण) आहे. पुढे भाषा व त्यातील वर्णसंख्या म्हणजे ध्वनी संख्या दिलेली आहे.

टेबलवरून सिद्ध होते की कोणतीही भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा वर्णोच्चाराच्या बाबतीत श्रीमंत आहे. शिवाय उच्चार स्पष्टता ही भारतीय भाषांची खासीयत आहेच. जिभेचे वळण बालवयातच लागते हा सर्वांचा अनुभव आहेच. मग ग्लोबलायझेशनच्या क्रेझ मुळे इंग्रजी उच्चारण बालकाला शिकविणे हे कितपत योग्य आहे? याचा विचार इतरांचे जाऊ द्या पण पालक म्हणून आपण करणे जरुरीचे नाही का? लहानबालकांना भारतीय भाषांमधील अक्षरज्ञान वा वर्णमाला शिकविणे बालकाच्या दृष्टीने अधिक लाभदायी नव्हे का?

मग बालकाला ए फॉर ऍपल पेक्षा अ, आ, ई शिकविणे जास्त गरजेचे नाही काय?

संस्कृत (वैदिक) ६४
संस्कृत (लौकिक) ५२
पाली ४३ किंवा ४१
हिंदी ४९
मराठी ४९
बंगाली ५२
तेलगू १६ + ४१
तामिल १३+ १८
गुजराती ४९
उर्दू ३६+१२
फारसी २९
अरेबी ३१
इंग्रजी २६
मल्याळम् १५+४१

- डॉ. प्रज्ञा देशपांडे

No comments:

Post a Comment